लोकप्रतिनिधींनी दम देऊनही शेतकरी विम्यापासून वंचीत
बुलढाणा, ४ ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंमलात आणली आहे. त्याच प्रमाणे उच्च शिक्षीतांसाठी आणलेल्या योजनेला लाडका भाऊ असे नाव देण्यात आले आहे. या योजनांच्या कामकाजामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे. केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात तात्कळ पिक वीमा टाकण्याचे आदेश दिल्यानंतरही त्यासंदर्भात टळाटाळ केली जात आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी ही ताकीद दिली होती की, शेतकऱ्यांना पिक वीमा वर्ग करा परंतू याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या महीन्याभरापासुन सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेतजमिनी चिबडल्या असुन खरीपातिल पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. शेतामध्ये पिकांपेक्षा तण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे यावर्षी पेरणीसाठी लावलेला पैसाही निघेल कि नाही याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही. पंरतु सुरु असलेल्या दारव्हा लाडकी बहिण, लाडका भाऊ योजनांचा बागुलबुवा करण्यातच प्रशासनातिल कर्मचारी व सत्तेतील नेत : व्यस्त असल्याने तालुक यातिल शेतकऱ्यांनी व्यथा मांडावी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. ओला दुष्काळ सदृष परिस्थीती असतांना कोण्याही लोकप्रतिनीधींकडुन ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणुन ओरड होतांना दिसत नाही. त्यामुळे अशा परीस्थीतीत आमचा वाली कोण असा प्रश्न शेतकरी विचारतांना दिसत आहे. खरीपातिल पेरणीसाठी अनेकांनी उसणवारी करुन बि-बियाणे खरेदी केले आहे. कधी अस्मानी तर कधी सुल्ताणी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांवर यावर्षी अस्मानी संकटाचा मारा होतो आहे. सोयाबिन पिक अतिप- ावसामुळे पिवळे पडले असुन पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसत आहे. तर कपाशीवरही मर रोग आल्याचे शेतकरी वर्ग सांगित आहे. अति पावसामुळे शेतजमिनी चिबडल्या असुन शेतात डवरे तसेच तणनाशकाची फवारणी करण्यासाठीही पाऊस उसंत घेत नसल्याने शेतात पिकांपेक्षातण जास्त झाल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे खरीप हंगामात चांगल्या उत्पादनाचा शेतकऱ्यांना भरोसा नसल्याने नापिकीमुळे येत्या काही दिवसात पुन्हा शेतकरी आत्महत्तेचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत कृषी तज्ञ व्यक्त करीत आहे. तर दुसरीकडे लाडकी बहीण व भाऊ शेतकामापेक्षा योजनेचे अर्ज भरण्यासाठी तासणतास रांगेत उभे राहत असल्याने शेतीकामासाठीही मजुरांची कमतरताही भासत आहे. अशातच सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने जमिनी चिबडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवावर राजकारण करणाऱ्यांनी लाडकी बहीण-भाऊचा बागुलबूवा करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या शेतावर जावुन परीस्थीतीचे अवल-ोकण करुन ओल्या दुष्काळासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.