सहा दिवसात ३ लाख ८७ हजार अर्जाची छाननी पूर्ण
बुलढाणा, ८ ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : राज्यभर एकाच योजनेचा सध्या बोलबाला चालू आहे, ती योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना या योजने अंतर्गत महिलांना १ हजार ५०० रूपये याप्रमाणे प्रत्येक महिन्याला ही रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनापूर्वी दिनांक १७ ऑगस्ट शनिवारला राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सुध्दा कार्यक्रमच्या माध्यमातून वाता वरण निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये जुलै महिन्यातील १ हजार ५०० आणि ऑगस्ट महिन्यातील १ हजार ५०० असे दोन्ही महिन्यांचे मिळून ३ हजार रूपये असा पहिला हप्ता जमा करण्यात येणार आहे. याबाबत काल झालेल्या मंत्रीमंडाळच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात प्राप्त झालेल्या ३ लाख ८७ हजार अर्जाची छाननी प्रक्रिया सहा दिवसात पार पाडण्यात आली आहे. अमरावती विभागातून बुलढाणा जिल्हा अर्जाच्या छाननी प्रक्रियेत अव्वल ठरला आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटिल,मुख्यकार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद येंडोले यांनी गटविका अधिकारी, सीडीपीओ व कर्मचाऱ्यांच्या मदतीने छाननीचे काम पुर्ण केले. ऑनलाईन प्राप्त अर्जामध्ये मेहकर तालुक्यात ४२ हजार ९५९ अर्जापैकी ४२ हजार ९५६, बुलडाणा तालुक्यात ३८ हजार ८०२ अर्जापैकी ३८ हजार ७९९, लोणार तालुक्यात २५ हजार ६६१ अर्जापैकी २५ हजार ६५७, खामगाव तालुक्यात ४७ हजार ६२० अर्जापैकी ४७ हजार ६०७, संग्रामपूर तालुक्यात २३ हजार २०६ अर्जापैकी २३ हजार १९८, चिखली तालुक्यात ४२ हजार ६३० अर्जापैकी ४२ हजार ६१३, नांदुरा तालुक्यात २५ हजार २२५ अर्जापैकी २५ हजार २११, शेगाव तालुक्यात २१ हजार ४१२ अर्जापैकी २१ हजार ४००, देऊळगाव राजा तालुक्यात १८ हजार २७५अर्जापैकी १८ हजार २५६, जळगाव जामोद तालुक्यात २४ हजार ४९ अर्जापैकी २३ हजार ९९४, सिंदखेड राजा तालुक्यात २९ हजार ५४ अर्जापैकी २८ हजार ९७१, मोताळा तालुक्यात २४ हजार १८९ अर्जापैकी २४हजार ११३, मलकापूर तालुक्यात २३ हजार ९९९ अर्जापैकी २३ हजार ९२३ अर्जाची छाननी तालुकास्- तरावर पूर्ण करण्यात आली आहे. पात्र आहे पण काही कारणांमुळे अर्ज करू शकले नाही. त्यांनी तात्कळ अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा. लाखो लाडक्या बहिणींचे अर्ज स्विकारण्यात आले आहे. फार कमी अर्ज बाद करण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे संबधीतांनी अर्ज भरत असतांना हमीपत्रावर सही न करणे किंवा अपुरी माहिती भरणे, आवश्यक कागदांची पुर्तता न केल्याने त्यांचेच बाद करण्यात आले आहे. ज्यांचे बाद झाले आहे, अशा महिलांनी परत संबधीतत बाबींची पुर्तता केली तर त्यांचाही अर्ज तात्कळ स्विकरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद येंडोले यांनी दिली आहे. तालुकास्तरावर स्विकृत करण्यात आलेले सर्व अर्ज जिल्हास्तरावर येणार आहे. यात अर्जाची जिल्ह- स्तरावरील समितीतर्फे पडताळणी होणार असून त्यानंतर योजनेचा प्रत्यक्ष लाभ दिला जाणार आहे. तालुकास्तरावर अर्ज छाननीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तालुकास्तरावर अर्ज छाननीचे काम पूर्ण करण्यात बुलडाणा जिल्हा अमरावती विभागात प्रथम आहे. सहा दिवसात छाननीचे काम पुर्ण केल्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.