आ.गायकवाड यांनी केले येळगाव धरणावर सपत्नीक जलपूजन
बुलढाणा, २५ ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) शहरातील नागरिकांना आता दिपावली पर्यंत दररोज पाणी पुरवठा केला जाईल, पाण्याचे योग्य नियोजन लवकरच केले जाईल कोणालाही पाणी टंचाईच्या झळा बसणार नाही, अशी ग्वाही आ संजय गायकवाड यांनी दिली ते, येळगाव धरण येथे जलपूजन विधीनंतर बोलत होते. बुलढाणा धरण यंदा ओवर प्लो झाल्याने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी येळगाव धरणावर सपत्नीक जलपूजन केले. ही पूजा रविवारी दुपारी पार पडली. मागील अनेक वर्षापासून बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणाची पाणी पातळी झपाटयाने कमी होत चालली होती. शुक्रवार पर्यंत ७५ टक्के भरलेले येळगाव धरण हे शंभर टक्के भरेल की नाही याची शाश्वती नव्हती. काही दिवसापासून सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे धरण ओवर प्लो होवून वाहत आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु झाल्याने हे धरण तुडुंब भरून वाहत आहे. जवळपास सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा शहरासह परिसरातील अनेक गावांना या धरणातून पाणीप वठा करण्यात येतो. बुलडाण्यात मागील मे महिन्यापर्यंत पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे या धरणात केवळ २० टक्केच जलसाठा शिल्लक होता. पाणी उपसामुळे वेगाने जलसाठ्यात घट ही होत होते. त्यातच कालपर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदारपणे हजेरी न लावल्याने बुलढानेकरांची चिंता चांगलेच वाढली होती. पैनगंगा वाहून जात असल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता आता कायमची मिटली आहे. नुकतेच आ संजय गायकवाड यांच्या नियोजनातून शहराला नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले आहे. सदर काम हे शहरवासियांना २४ तास पानी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. आता धरणात मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने दिपावली पर्यंत नागरिकांना दररोज पाणी पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन आमदार गायकवाड यांनी दिले आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा पुजा गायकवाड, पालिकेचे प्रशासक गणेश पांडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ओमर्सिंग राजपूत नगरसेवक मंडळी आदी मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होती. डोंगर खंडाळा येथे दुप्पट धरण उभे राहणार बुलडाणा तालुक्यातील डोंगराखंडाळा या भागात नवीन धरण उभारण्याचे काम लवकरच सुरु केले जाणार आहे त्या धरणाची क्षमता येळगाव पेक्षा ही दुप्पट असणार असून बुलडाणा शहरातील नागरिकांना न भुतो न भविष्य असे धरण उपलब्ध होणार असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या ही कामय स्वरुप संपणार असल्याची माहिती आ गायकवाड यांनी दिली. शहराला पाणी पुरवठा करणाया येळगाव धरणात गाळ उपसा करण्यात आला होता, त्यामुळे या धरणाची क्षमता आता पूर्वी पेक्षाही अधिक झाली आहे यंदा तर श्रवणाच्या शुध्द पाण्याने हे धरण भरले आहे, त्यामुळे मी विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्यावतीने ईश्वराचे आभार मानतो असे भावनिक उदगार ही त्यांनी काढले.