हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध

बुलढाणा, २० सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) आमदार संजय गायकवाड यांनी चहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या विधानाच्या विरोधात युवक काँग्रेसने आज गांधी भवन येथे धरणे आंदोलन आयोजित केले होते. काँग्रेसच्या या आंदोलना विरोधात आमदार गायकवाड समर्थकांनी जयस्तंम चौकात येऊन प्रचंड घोषणाबाजी केली. दोन्ही गटांमध्ये नारेबाजी सुरू झाल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त जयस्तंभ चौकामध्ये दाखल झाला. दरम्यान माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकत्यांना पोलिसांनी स्थानब्द्ध केल्यामुळे काँग्रेसला आंदोलनाचा गाशा गुंढाळावा लागला. आमदार गायकवाड यांचे स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे नगर परिषदेचे माजी सभापती आशिष बावस्कर, युवा सेनेचे श्रीकात गायकवाड, धाड येथील निलेश गुर्जर असे काही प्रमुख चेहरे शिवसैनिकांमध्ये सहभागी होते. दरम्यान काँग्रेसचे एक शिष्ट मंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी पोहोचले होते. ते जयस्तंभ चौकामध्ये दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. दुसऱ्या बाजूला आमदार गायकवाड समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये मोठा राडा होण्याची शक्यता पाहता पोलिसांनी जयस्तंभ चौकामध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला होता. राहुल गांधी यांची जीभ छाटण्याच्या विधानावरून आमदार संजय गायकवाड यांनी एक पाऊल मागे आले असले तरी काँग्रेसच्या मनात त्यांच्याविरोधातील रोष कायम असल्याचे दिसून येत आहे. बुलढाणा येथे शहर पोलिस ठाण्यात राज्याचे प्रभारी कुणाल चौधरी आणि आ. धीरज लिंगाडे, आ. राजेश एकडे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आ. गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे आ. गायकवाड यांच्या विरोधात पोलिस तक्रारही झाली आहे. आज, २० सप्टेंबर रोजी गांधी भवन येथे युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन उभे करण्यात आले. निवेदन देण्यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ गेलेले असतांनाच आ. गायकवाड यांच्या समर्थकांनी जयस्तंभ चौकाचा ताबा घेतला. आमदारांविरोधात शब्दही बोलाल तर सोडणार नाही, अशी खुली धमकीच आ. गायकवाड समर्थकांनी दिली. स्टेजवर लावलेले बॅनर काढण्याची मागणीही यावेळी शिवसैनिकांनी केली, ज्यात आ. संजय ‘ गायकवाड यांचा निषेध, असे लिहीलेले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने बाचाबाची टळली. अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, डीवायएसपी सुधीर पाटील तसेच ठाणेदार नरेंद्र ठाकरे, ग्रामिणचे श्री कांबळे आणि इतर काही पीआय तगड्या बंदोबस्तासह घटनास्थळी होते. दंगा काबू पथकाची गाडी डोक्यावर हेल्मेट घालून आणि हातात दंडुके घेवून परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी सज्ज होती. काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी दोन व्हॅनमध्ये घेवून गेल्यामुळे राडा टळला.

देशद्रोही गुंडांची सुपारी घेऊन पोलिसांची आंदोलकांवर कारवाई झाली असून संजय गायकवाड यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाचे आंदोलन चिरडण्याचे पोलिसांना आदेश आले असल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. रीतसर पोलीस परवानगी घेतलेली असतानाही पोलिसांच्या कारवाईवर आश्चर्य व्यक्त करत ते म्हणाले की, दुसरीकडे विनापरवानगी गुंडांच्या टोळीला संरक्षण दिले जात असल्याचे आज बघावयास मिळाले. चुकीला चूक न म्हणता जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वाचाळविरास तथा बुलढाणा तमाम अवैध व बेकायदेशीर व्यवसायांना संरक्षण तर न्यायाची मागणी करणाऱ्या काँग्रेसला लगातार दुसऱ्या दिवशी हे स्थानबद्धतेचा दंड मिळाला आहे. ‘ कुछ दिन सबर करो, मौका सभी को मिलता है’, या शब्दांत त्यांनी आपली सूचक प्रतिक्रिया दिली. शेवटी ते म्हणाले की, ये सरकार हमसे डरती है !! पोलीस को आगे करती है !!