बुलढाणा, २२ ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) गझल, कविता, साहित्यप्रेमी बुलढाणेकर एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून मैत्रीचे गुण गात होते. सगळ्यांच्याच एकमुखी स्वरातून मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा… हे गीत ऐकायला मिळाले. मैत्रीचे राष्ट्रगीत बनलेल्या यारचनेचे रचनाकार प्रसिध्द कवी, अनंत राऊत यांच्या प्रमुख उप- स्थितीत पार पडलेल्या मराठी गझलांची कोजागिरी’ या कार्यक्रमातील हे भावपूर्ण दृश होते. दरवर्षी प्रमाणे मित्रांगण परिवाराच्या पुढाकारातून कोजागिरी पोर्णिमेनिमित्त मराठी गझलांची कोजागिरी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्थानिक गर्दै हॉल सभागृहात २१ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम दिमाखात पार पडला. मागील ८ ते ९ वर्षांपासून गझलप्रिय बुलढाणेकरांसाठी मित्रांगण परिवार दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करत आले आहेत. साहित्याची जाण असलेल्या शहरवासियांची वैचारिक भूक भागविण्याचे व्रत मित्रांगण परिवाराने हाती घेतले आहे. मागील वर्षी मराठी गझलसृष्टीचे वैभव’ असलेल्या वैभव जोशी यांचा सोबतीचा करार मित्रांगण’ ने घडवून आणला होता. सोमवारी संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी उसळली होती. राजकीय, सामाजिक, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रातील तसेच अगदी तळागाळात काम करणारा सामान्य माणूस या मैफलीत सहभागी झाला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मित्रांगण परिवारातील दिवंगत सदस्य प्रकाश जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. विक्की चव्हाण यांच्या मातोश्री यांचे सुद्धा काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने त्यांचाप्रती शोक संवेदना व्यक करण्यात आल्या. गझलकार सतीश दराडे यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. देशाचे अनमोल रत्न रतन टाटा यांच्याही स्मृतीस अभिवादन करण्यात आले. जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्यभरात प्रसिद्ध असलेले गझलकार गोपाल मापारी यांनी कवी अनंत राऊत यांना बुलढाणेकरांची ओळख करून देत आपल्या निवेदनाला सुरुवात केली. यानंतर अनंत राउत यांनी एकापेक्षा एक सकस गझल, कवितांचे सादरीकरण करीत उपस्थितांची मने जिंकली. जगाचा वेग हा माझ्या मनाला भावला नाही, बोललो कितेकदा पण व्यक्त होणे टाळले, आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे, अशा अनेक दर्जेदार कविता त्यांनी सादर केल्या. कार्यक्रमाच्या अंतिमटप्यात मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा हि कविता अनोख्या अंदाजाने सादर करून उपस्थित श्रोत्यांना सामावून घेत अनंत राऊत यांनी बुलढाणेकरांची भावनिक दाद मिळवली. यावेळी मैत्री गहीवरून गेल्याची प्रचीती अनेकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन मित्रांगण परिवाराचे चंदशेखर जोशी, आनंद संचेती, कमलेश कोठारी, डॉ. राजेश्वर उभरहंडे, मनोज बुरड, रणजीतसिंग राजपूत, सुनीता प्रकाश जोशी, रितेश जैन यांनी केले. सूत्रसंचालन रणजीत राजपूत यांनी केले. यांच्या’ विशेष सहकार्याने कार्यक्रमात रंगत वसुंधरा अर्बन, साधनाश्री कन्सट्रकशन, राज एंटरप्रा- इजेस, एस टू के वस्त्रदालन, दिशा महिला बचत गट, माऊली ज्वेलर्स यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रमाची शोभा वाढविली. यामुळे, उपरोक्त क्षेत्रातील प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. रसिकांचा उत्साह पाहून कवी अनंत राऊत ही भारावले मी आजवर अनेक कार्यक्रम केली. रसिकांची चांगली दाद मिळणे ही एका कलाकाराची प्रामाणिक अपेक्षा असते. मात्र गझल, कवितेची जाण असणारा असा रसिक मला बुलढाण्यात पहायला मिळाला अशा शब्दांत अनंत राऊत यांनी कौतुक केले. तसेच आभारही मानले.