कृषी केंद्र संचालकासह कंपनी मॅनेजरला 2 वर्षाची शिक्षा
बुलढाणा, 2 मार्च (प्रतिनिधी) : मिश्र खतामध्ये भेसळ आढल्याने कृषीदेव खत कारखान्याचे मॅनेजर पी व्ही देशमुख व कृषी केंद्र वरंवट बकालचे नंदकिशोर राठी यांना 2 वर्षाचा साधा कारवास व 10 हजार रूपये अशी शिक्षा खामगाव न्यायालयाने सुनावली आहे.
मिश्र खतामध्ये भेसळ आढल्याने व ते खत आरोपी यांनी आसलगाव येथील दुकानातून विक्रीसाठी ठेवल्याने व त्या बाबतचे दोन प्रयोगशाळेचे खामगाव येथील न्यायालयाने आज दोन आरोपी यांना प्रत्येकी 2 वर्षाची साधी सजा व 10 हजार रूपये दंड ठोठवण्यात आला आहे. दंड न भरल्यास 3 महिने सश्रम सजा अशी शिक्षा दिली. आरोपी कृषिदेव खत कारखाना अमरावती चे फॅक्टरी चे मॅनेजर पी व्ही देशमुख रा अमरावती व नंदकिशोर भिकमचंद राठी, राठी कृषी केंद्र वरंवट बकाल यांना शिक्षा सुनविण्यात आली आहे.
घटना अशी की पंचायत समिती कृषी अधिकारी कार्यालय संग्रामपूर कडून चक्रधर उंद्रे यांनी 28 जून 2013 रोजी राठी कृषि केंद्र यांच्या दुकानाची तपासणी केली त्यामध्ये त्यांना मिश्र खतात अनियीमितता आढळली त्यावरून मिश्र खत काढून परीक्षणा करता पाठवले, परीक्षण अहवाल 31 जुलै 2013 रोजी प्राप्त होऊन त्यामध्ये मिश्र खतात मानका प्रमाणे नायटरोजन, फोस्पेट व पोटॅश ची मात्र प्रमाणे आढळली नाही. आरोपीनी त्या तपासणी अहवाला विरुद्ध अमरावती कार्यालयात अपील दाखल केले व सॅम्पल हे पुनःतपासणी साठी बंगळूर येथील प्रयोग शाळेत पाठवण्यास सांगितले त्यावरून सॅम्पल हे बंगळूर येथे पाठवले व त्याचा रिपोर्ट हा 26 फेबु्रवारी 2014 रोजी प्राप्त झाला व त्यामध्ये सुद्धा मानका प्रमाणे मिश्रखत बनवलेले नसल्याचे दिसून आले. त्यावरून 16 डिसेंबर 2015 रोजी चक्रधर पुंडलिक उंद्रे यांनी न्यायालयात प्रकरण दाखल करून कलम 19(1)(ए)(बी) फर्टीलाजर कंट्रोल ऑर्डर व कलम 7(2)(ए), 7(i)(ए)(ii) जीवनावशक वस्तू कायद्याप्रमाणे प्रकरण दाखल केले. प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अॅड.उदय आपटे यांनी साक्षीदार तपासले व दोन्ही कायद्याच्या तरतुदीवर युक्तीवाद केला तसेच प्रकरण हे शेतकर्यांच्या शेती बाबतच्या संवेदनशील मुद्यावर असून प्रकरणात श्री.उंद्रे यांची साक्ष तसेच दोन्ही प्रयोगशाळेचा अहवाल जो शाबीत झाला. त्या आधारे दोन्ही आरोपीना कायद्या प्रमाणे संपूर्ण 7 वर्षाची सजा व 1 लाख दंड देण्यासाठी प्रयत्न केला. आज विद्यमान न्यायालयाने दोन्ही आरोपींना कायद्याच्या तरतुदी , नुसार प्रत्येकी 2 वर्षाची सजा व प्रत्येकी 10 हजार रूपये दंड व तो न भरल्यास 3 महिन्याची सजा असा महत्वपूर्ण निर्णय दिला. सरकारी वकील उदय आपटे यांचे असे कथन आहे की वर नमूद कायद्याखाली खामगाव सेशन कोर्टात अशा प्रकारचा पहिलाच न्यायनिर्णय झाला असून सर्व शेतकरी बांधवाना सदर न्यायनिर्णय समर्पित आहे असे अॅड आपटे यांनी सांगितले.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे जे भेसळयुक्त खत विकतात अशा कृषी कंपन्या व कृषी चालकांना धसका बसला आहे. यामुळे कुठेतरी शेतकर्यांना दर्जेदार खत मिळेल आणि कुणी असे पाऊल उचलणार नाही अशी अशा व्यक्त होत आहे.