spot_img

नासलेली डाळ आणि भात घेऊन आ. गायकवाड पोहोचले विधानसभेत!!

कँटीननंतर आता विधानसभेत राड्याची शक्यता

बुलढाणा, 9 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : निकृष्ट जेवणाच्या मुद्द्यावरून आमदार निवासच्या कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड विधानसभेतही राडा करण्याची शक्यता आहे. कॅन्टीनवाल्यांनी पार्सल दिलेली डाळ आणि भात घेऊन आ. गायकवाड विधानसभेत पोहोचले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जर आमदारासारख्या लोकप्रतिनिधींना अशा प्रकारचे निकृष्ट आणि आरोग्याला हानी पोहोचवणारे जेवण मिळत असेल तर सामान्यांचे काय? असा सवाल ते विधानसभेत उपस्थित करण्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये राडा केल्याचा व्हिडीओ समोर आला. आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरुन संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. या दरम्यानचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. आकाशवाणी आमदार वसतिगृहात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण केल्याचंही यावेळी दिसून आलं. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवले होते, पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आला. डाळाची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला याबाबत विचारणा केली, त्याचबरोबर यावेळी त्यांनी कोणीही बील देऊ नका असंही सांगितलं, त्याचबरोबर बील काऊंंटरवरती बसलेल्या ऑपरेटरच्या कानशिलात देखील लगावली. या घटनेचा आणि गोंधळाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.काल (8 जुलै) रात्री मुंबई स्थित आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ऑर्डरप्रमाणे रूममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेलं डाळ आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता, असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरलं. यापूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितलं व आज सभागृहात हा मुद्दा  उचलणार असल्याची माहितीही संजय गायकवाड यांनी दिली. आमदार निवासमध्ये डाळ-भात आणि पोळी जेवण मागवलं होतं. पहिला घास खाल्ला तर आंबट लागला आणि मला उलटीही झाली. त्यानंतर मी डाळीचा वास घेतला, तर भयंकर होता. त्यामुळे मी जाब विचारण्यासाठी कॅन्टिनमध्ये गेलो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोक इथे येतात. तसेच याआधी देखील मी दोन-तीन वेळा त्यांना समज दिली होती. एका आमदाराला हे लोक जर विषारी जेवण देतात, मग सामान्य माणसांचं काय होत असेल?, असा सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित केला.
https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत