
बुलढाणा, ९ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) जयश्रीताई शेळके यांचे बालपण राजकीय वातावरणात गेले. आजोबा राजकारणात सक्रिय असल्याने राजकारणाचे धडे त्यांना बालवायालच मिळाले. तर लग्नानंतर सासर कडे सहकार व समाजकारणाचे वातावरण होते. राजकारणासोबत समाजकारणाची जोड मिळाल्याने जयश्रीताई शेळके ह्या समाजाभिमुख’ लोकनेता’ ठरल्या. त्यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली ती काँग्रेसमध्ये…. काँग्रेसमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी जोपासले. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विधानसभेची उमेदवारी घेत असताना याच संबंधाच्या जोरावर दोन्ही पक्षांना जोडणाऱ्या दुवा त्या ठरल्या असून दोन्ही पक्षांसह जनसामान्यांना देखील त्या आपल्या उमेदवार वाटत आहे. जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पुरुषप्रधान चित्र असले तरी आपली कर्तबगारी व क्षमतेने त्या राजकीयदृष्ट्या अग्रभागी आहे. त्यांची क्षमता लक्षात घेऊन त्यांना प्रदेश काँग्रेस मध्ये देण्यात आलेले सचिव पद आणि त्यांनी साखळी (तालुका बुलढाणा) जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सदस्य म्हणून केलेली विकास कामे त्यांचे कर्तृत्व सिद्ध करणारे ठरले. काँग्रेसच्या विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग लक्षणीय ठरला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बहुचर्चित ‘भारत जोडो’त त्यांनी घेतलेला कल्पक सहभाग नेत्यांच्या कौतुकास पात्र ठरल्या. शाहू परिवाराच्या माध्यमाने त्यांनी राबविलेल्या योजना, उपक्रम सामान्य घटकांसाठी उपयुक्त ठरले. समाजकारण, राजकारण, सहकार, बचतगट, महिला सक्षमीकरण, कृषी, विधी, उद्योग आदी विविध क्षेत्रात त्यांचा चौफेर वावर आहे. मुत्सद्दी राजकारणी, उत्कृष्ट वक्ता, कुशल संघटक, संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. त्यांनी पुणे विद्यापीठातुन एम. ए. (इंग्रजी) तर अमरावती विद्यापीठातून एल.एल.बी. ची पदवी घेतली आहे. सासरकडून त्यांना सहकाराचा वारसा लाभला आहे. सासरे भाऊसाहेब शेळके यांनी २००२ मध्ये राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. ग्रीन ऍग्रो बाजार कंपनी ही करार पद्धतीने अंडी उत्पादन करणारी देशातील पहिली कंपनी ठरली. जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून जयश्रीताईंनी मतदारसंघात विकासकामांचा झंझावात निर्माण केला. शिरपूर पाणीपुरवठा योजना, देवपूर पाझर तलाव, शिरपूर साखळी रस्ता काम, अंगणवाडी बांधकामे, शेतरस्त्यांची कामे, वाचनालय, व्यायामशाळा निर्मिती ही त्याची ठळक कामे ठरली.