spot_img

जिल्ह्यातील सातही विधानसभा लढणार ! तूपकर कुठून लढणार ? सस्पेंन्स कायम

बुलढाणा, ६ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आज, ६ जुलै रोजी रविकांत तुपकर यांनी पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. बुलडाणा शहरातील गोलांडे लॉन्स येथे ही बैठक झाली. या बैठकीत रविकांत तुपकर यांनी कार्यकत्यांची मते जाणून घेतली. भाऊ आता थांबू नका, शेतकरी आपल्या पाठीशी आहेत. आता थांबायचे नाही विधानसभा निवडणूक लढायचीच असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते यावेळेस हजर होते. कुणी सिंदखेडराजा विधानसभेतून, काही कार्यकत्यांनी चिखली, काहनी बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून तुपकर यांनी निव्द्वणूक लढवावी, असा आग्रह धरला, काही कार्यकत्यांनी रविकांत तुपकर यांनी एखाद्या पक्षात प्रवेश करून निवडणुक लढवावी असेही मत व्यक्त केले. अखेर बैठकीच्या शेवटी रवेकांत तुपकर यांनी सर्व कार्यकर्त्यांची मते विच ारात घेत मोठी राजकीय घोषणा केली. बुलढाणा जिल्ह्यातील ३ ही विधानसभा स्वबळावर लढणार असल्याची त्यांनी घोषणा केली तर राज्यपातळीवर निर्णय पुण्यात बैठक घेवून जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुरवातीला बोलतांना राविकांत तुपकर म्हणाले की, आपली लढाई विस्थापितांची लढाई आहे, त्यामुळे सगळ्यांनी मनमोकळे पणाने बोलावं, तुमची मल लक्षात घेता यावी, झालेल्या चुका दुरुस्त करून पुढे जाता यावा यासाठी बैठकीचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. ही लढाई तुमच्यामुळेच इथपर्यंत आली आहे असेही तुपकर म्हणाले. तुम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्यामुळेच अख्ख्या महाराष्ट्रात बुलडाणा लोकसभेची निवडणूक गाजवू शकलो ज्यांनी नतदान केले त्यांचे धन्यवाद ज्यांनी मतदान केले नाही त्यांच्याबद्दल देखील माझ्या मनात कोणताही राग नाही. अनुपक आनण या निवडणुकीत नसतो तर कदाचित मतदानाची टनेवारी कमी झाली अत्तती, आपल्यामुळे या लढतीत रंगत आली. पक्ष नसतांना, पैसा नसतांना, सगळे पुढारी विरोधात असताना सामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतली त्यामुळे सगळ्या पुढान्यांनी तोंडात बोट घातली आहेत. सामान्य घरातील पोरगा प्रस्थापितांच्या नाकात दग आणू शकतो हा संदेश बुलडाणा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेला असल्याचे ते म्हणाले. आगखी ६०-७० हजार मते मिळवता आली असती तर थोड्याफार फरकाने आपण जिंकलोही असतो, अशा भावना तुपकरांनी यावेळी व्यक्त केल्या. काही आमदार आपल्याला २५ ३० हजाराच्या पुढे धस्त नव्हते. मात्र निकाल लागल्यानंतर त्यांच्या नाकात दम आला एका जत्रेने देव म्हातारा होत नाही, आपल्याजवळ गमावण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे इकड कमी झालो, तिकड कमी पडलो याने निराश न होता जिथे कमी पडलो तिथे कशी उभारी घेता येईल याचा विचार करून पुढे जायचं आहे. ज्या पुढाऱ्यांनी आपल्याला प्रचंड विरोध केला त्यांच्या नावातच आपल्याला लीड आहे. अनेक पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या गायत आपग पुढे आहोत आपल्यामुळे नेत्यांना शेतकऱ्यांची ताकद कळल्याचे देखील तुपकरेंनी यावेळी बोलून दाखविली. रविकांत तुपकर यांच्या भाषणाआधी कार्यकर्त्यांनी आपापली मते व्यक्त केली. यावेळी कोणी पक्षात जाण्याचा तर कोणी स्वतंत्र पक्ष उभा करण्याच्या भावन व्यक्त केल्या, तर कुणी सिंदखेडराजा, तर कुणी चिखली तर कुणी बुलडाण्यातून लढा लढण्याचा तुपकरांना आग्रह केला. यासर्व समर्थकांच्या भावना तुपकरेंनी यावेळी शांतप्णे ऐकून घेतल्या. २२ वर्षाच्या प्रवासात जे निर्णय घेतले ते माझ्यावर प्रेम करणान्या लोकांना विचारूनच घेतले. हा पराभव जो आपला झाला, त्याची जबाबदारी माझी आहे. मी या पराभवाला कुणालाही जबाबदार धरणार नाही. विधनसभा निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही साथ द्याल का? असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला य वेळी कार्यकर्त्यांनी एकमुखाने हंकार भरला. शेतकऱ्यांची गोठी ओट बँक उभी करून बुलडाणा जिल्ह्यातल्या सहाही विधानसभा मतदारसंघात आपण उमेदवार उभे करणार आहोत, आणि हे सर्व उमेदवार शेतकऱ्यांचे उमेदवार असतील, अशी घोषणा रविकांत तुपकर यं’नी केली. उद्यापासून स्वतंत्रयपणे आपण तयारीला लागणार आहोत. ६ विधानसभा मतदारसंघात उमेदवार जिंकण्यासाठी उभे करायचे आहेत, अशी घोषणा तुपकर यांनी केली. स्वतः कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार यावर त्यांनी आजच्या कार्यक्रमात त्यांनी भाष्य केले नाही. तर राज्यपातळीवर निर्णय पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून जाहीर करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत