जिल्हा पोलिस अधीक्षकांना ननावरे परिवाराचे निवेदन; चार महिने उलटूनही कारवाई नाही
बुलढाणा, १३ सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : आकाश ननावरेचे मारेकरी अजून मोकाटच आहे. त्यांना तात्कळ अटक करा अशी मगाणी त्याच्या आईन पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांच्याकडे केली आहे. आपल्या मुलाचा मारेकरी अद्यापही मोकाट असून वारंवार तक्रारीनंतर देखील त्याला अटक करण्यात आलेली नाही. सदर मारेकरी व अवैध सहकार योगेश भिकाजी सहभागी याला तत्काळ अटक करून न्याय द्यावा अशी मागणी मृताच्या आईने जिल्हा पोलिस अधीक्षकाकडे केली. यावेळी मृताच्या आई-वडिलांनी निवेदन हे दिले. सदर निवेदन मेहकर येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ११ सप्टेंबर रोजी दिले. या निवेदनात मृताच्या परिवाराने आरोप केला की, २७ मे रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान येथील जानेफळ रोडवरील स्मशानभूमी मागे आपला मुलगा आकाश ननावरे यास व्याजाचे पैशासाठी आरोपीने दगड व काठीने ठेचून मारले. या घटनेनंतर आपण पोलिसांना तक्रार देण्यासाठी गेलो असता प्रथम मेहकर पोलिसांनी अवैध सावकार योगेश सौभाग्ये याच्या विरोधात तक्रार घेण्यास नकार दिला. त्यानंतर आपण उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर यांच्याकडे तक्रार केली असता उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मेहकर पोलिस ठाण्यास दिले. परंतु मेहकर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षकांनी एफआयआर मधून मुख्य आरोपी योगेश भिकाजी सौभाग्ये याचे नाव वगळून इतर आरोपींवर गुन्हा दाखल करून उलट आम्हालाच दमदाटी करून तेथून हाकलून लावले. त्यानंतर न्याय मिळवण्यासाठी आम्ही तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या बुलडाणा येथील कार्यालयासमोर १५ जून रोजी उपोषण केले. मुख्य अवैध सावकार योगेश सौभाग्ये याला अटक करण्याची मागणी केली. सदर उपोषण २८ जून पर्यंत करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या आश्वासनानंतर सदर उपोषण मागे घेतले. मात्र अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर देखील अद्यापही या प्रकारात कोणतीही कार्यवाही करण्यात आले नाही. सदर कारवाईसाठी आम्ही वारंवार मेहकर पोलिस स्टेशनमध्ये पाठपुरावा केला. परंतु मुख्य आरोपी योगेश अजूनही मोकाटच आहे. तो सध्या आमच्या परिवाराला जीवे मारण्याच्या धमक्या देत असून माझे कोणीही काही वाकडे करू शकत नाही, हे प्रकरण संपल्यावर मी तुम्हाला बघून घेईल अशा धमक्या देतो, असा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. याप्रकरणी लक्ष घालून आरोपीला तत्काळ अटक करावी व आमची शारीरिक मानसिक त्रासापासून मुक्तता करावी अशी मागणी करण्यात आली आहे.