वसंतराव मगर आता वंचितकडून लोकसभेच्या मैदानात
‘मी संविधानप्रेमी.. निवडणूक जिंकणारच’ : वसंतराव मगर
बुलढाणा, २७ मार्च (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत): वंचितचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर उपाख्य बाळासाहेबांनी राजकिय विश्लेषकांना शेवटी हादरा दिलाच.. ९ जागांवर त्यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केलीय.. हा योगायोग नसावा परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उबाठा उमेदवारांची यादी सोशल मिडीयावर झळकताच बाळासाहेब आंबेडकरांनी काही वेळातच पत्रकार परिषद घेवून आपले उमेदवार घोषित करून टाकले. याचा धक्का बुलढाणा लोकसभेलाही बसला आहे. देऊळगांवमाळी निवासी इंजिनिअर वसंतराव मगर यांना वंचितची उमेदवारी मिळाली आहे. आतापर्यंत तीनदा विधानसभा निवडणूक हरलेले वसंतराव मगर पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत. जातीने माळी असलेले मगर अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांच्या न्याय हक्काची भाषा करतात. ‘मी संविधान प्रेमी आहे.. बाबासाहेबांना मानणारा आहे.. मी निवडणूक जिंकणारच..’, हा आत्मविश्वास त्यांनी गुड इव्हिनिंग सिटीला दिलेल्या संक्षिप्त मुलाखतीत व्यक्त केला आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर स्वतः अकोला मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या मतदारसंघातही माळी समाजाचे प्राबल्य आहेत. यापू- र्वीही त्यांनी बळीराम सिरस्कार यांना बुलढाण्यातून लढविले. आता वसंतराव मगर यांना उमेदवारी देण्यामागे २४ नोव्हेंबर १९६२ चा जन्म.. १९८४ मध्ये अभियांत्रिकी पदविका मिळविली.. सन १९९० शिवसेना भाजप युतीवर सिंदखेडराजा मतदार निवडणूक लढविली.. तोताराम कायंदे २१०० मतांनी विजयी झाले होते. सन १९९५ मध्ये सिंदखेडराजा विधानसभा निवडणूकीत भारिपबमसं पुरस्कृत अपक्ष उमेदवार.. पराभूत परंतु दूसऱ्या क्रमांकाची मते प्राप्त.. मध्वे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश.. तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी.. राज्यपाल नियुक्त प्रादेशिक परिवहन अमरावती विभाग मध्ये सहभाग.. बसपाकडून निवडणूक लढले.. याठिकाणी उमेदवार पराभूत.. परंतु वसंतराव मगरही ? आंबेडकरांचा हेतू माळी समाजाचे समर्थन प्राप्त करण्याचाही असू शकतो. अर्थात माळी आणि बौद्ध समाजाची अधिकाधिक मते घेवून इतर मते घेण्यात मगर यशस्वी राहिले तर विजय वंचितचाच होईल, असे सुंदर समीकरण आंबेडकरांच्या डोक्यात असावे. वसंतराव मगर गुड इव्हिनिंग सिटीसोबत बोलतांना म्हणाले की, ‘बाळासाहेबांनी दिलेला विश्वास सार्थ ठरवेल.. बाळासाहेबांची भूमिका आहे की, महाराष्ट्रातील वंचित, उपेक्षित वर्ग, जो सत्तेपासून दूर असणाऱ्या समाजाला प्रवाहात आला पाहीजे.. संविधानाला अपेक्षित ही निवडणूक आहे..’. काय मुद्दे महत्वाचे वाटतात? यावर ते म्हणाले स्थापत्य की, बुलढाणा जिल्ह्यात मोठा शैक्षणिक मध्ये बॅकलॉग आहे.. शेतीप्रधान देश, जिल्हा संघातून परंतु एमआईडीसी ओस… शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारले तर दोन पैसे शेतकऱ्यांना मिळतील.. त्यांच्या मालाला भाव मिळेल… बेरोजगारांना काम मिळेल.. सिंचनाच्या बाबतीत १९९९ जिल्हा मागे.. लोकप्रतिनिधींची मेहकर उदासिनता याला कारणीभूत आहे.. २००२ मध्ये भारतभाऊ बोंद्रेचा अपवाद वगळता प्राधिकरण यावर कुणीच काम केले नाही.. परंतु २०१४ मध्ये मला सिंचनाच्या बाबतीत आणखी काम राष्ट्रवादीचा करण्याची इच्छा असल्याचेही ते बोलले. हरले. खा. प्रतापराव जाधव यांच्यावर टिका करतांना मगर यांनी म्हटले की, ९६ गावांच्या अडचणी आहेत.. दोन पिढ्या खपल्या परंतु साखरखेर्डा तालुक्याचा विषय सोडविता आला नाही.. मला तो सोडवायचा.. ७०-७० गावचे डेप्युटेशन मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेलो आहे.. तीनदा पडलो.. कधी गुलाल मिळाला नाही, परंतु थांबलो नाही.. जनतेची कामे करीत राहिलो.. मी कायदा हातात घेवून काम करणारा किंवा आक्रमक वृत्तीचा नाही.. संविधान मानणारा, शिस्तबद्धता मला आवडले.. जनतेचा विश्वास संपादन करून पुढे बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेला मानणारा नाही.. एकमेकांच्या विरोधात लढणारे प्रतापराव जाधव, डॉ. शिंगणे, बळीराम सिरस्कार एकमेकांच्या गळ्यात गळा घालून फिरतायेत.. जनता हे ओळखून आहे.. म्हणून मला निवडून देईल’, या शब्दांतून त्यांचा आत्मविश्वास झळकत होता.