बघा आबांची exclusive मुलाखत
तीन वेळा डिपॉझिट जप्त तरी उमेदवार 72 वर्षीय दिनकर तुकाराम संबारे पुन्हा लोकसभेच्या रिंगणात सिटी प्लस चॅनेलवर बघा exclusive मुलाखत बुलढाण्यातील सोळंके ले-आऊट मध्ये राहतात संबारे संबारे यांना सोडवायचा जिल्ह्यातील पाणी प्रश्नअपक्ष म्हणून पुन्हा एकदा संबारे लढतायेत”मागे घेण्यासाठी अर्ज भरत नाही”: दिनकर संबारे आधी टेलरिंग आता मजुरी करतात संबारे सिटी प्लस चॅनेलवर संबारे यांची मुलाखत.
७२ वर्षाचा ‘तरुण’ लोकसभेच्या रिंगणात
एकदा विधानसभा, दोनदा लोकसभा लढविलेले दिनकर तुकाराम संबारे .
बुलढाणा, ६ एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी/अजय काकडे): लोकसभेची सर्वत्र रणधुमाळी चालू आहे. आशातच बुलढाणा लोकसभेसाठी ७२ वर्षांचा तरूण निवडणूक रिंगणात उभा आहे. दिनकर संबारे यांनी २०२४ च्या लोकसभेसाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे. आजपर्यंतच्या खासदारांनी जे केलं नाही. त्यापेक्षाही अधिक काही करण्याची आवश्यकता आहे. यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उभे आहोत. अत्यंत साधा माणूस… पायजमा-शर्ट घातलेला.. पांढरीफटक दाढी.. जाड भिंगाचा चष्मा.. अंगकाठी वृद्धत्वाची साक्ष देत असली तरी बोलणे कडक.. आणि उच्चार स्पष्ट… संबारे आबांनी तब्बल तीन निवडणूका लढविल्या व आता चौथ्यांदा निवडणूकीसाठी तयार आहे. त्यांच्या पाठीमागे २००९ ची बुलढाणा विधानसभा, २०१४-२०१९ च्या लोकसभा लढविण्याचा अनुभव आहे. ते कुठल्या पक्षाच्या उमेदवारी वर नाही, तर अपक्ष रिंगणात आहे. स्वतः मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच शिक्षण हे दहावी पर्यंत झाले आहे. त्यांनी २००९ मध्ये सर्वप्रथम विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत त्यांना २०७८ ऐवढी मते पडली होती. त्यांच डिपॉझिट जमा झाले होते. नंतर २०१४ ची लोकसभा त्यांनी लढवली त्यामध्ये त्यांना २००६ मते पडली होती. २०१९ च्या लोकसभेत त्यांची मत दुप्पट झाली होती. त्यांना ४१६२ मते पडली होती. तिन्ही वेळेस त्यांच डिपॉझिट जप्त झाले आहे. गुड इव्हिनिंग सिटीने त्यांची मुलाखत घेतली असता बोलतांना त्यांनी सांगितले की, कृषी व सिंचनाचे असे काही प्रकल्प त्यांच्याकडे आहे की, बुलढाणा हा पाण्याने समृध्द झाल्याशिवाय राहणार नाही. खामगाव जालना रेल्वेमार्गाचे सतत गााजर दाखवित इथल्या निवडणूका होत आहे. प्रदुषण रोखण्यासाठी सर्वत्र वृक्ष लागवडच नाही तर वृक्ष संवर्धन सुध्दा महत्वाचे आहे. जर जनतेने संधी दिली तर पर्यावरणावर सर्व प्रथम काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. बुलढाणा शहर हे उंच ठिकाणावर असल्याने येथे पवनचक्की बसवल्यास वीजनिर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्यास शेतीला मुबलक वीज मिळू शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होऊ शकेल. त्यांना विच- गुडारले असता अर्ज मागे घेणार का ? तर त्यांनी सांगितले आज पर्यंत घेतला नाही व आताही घेणार नाही! जनता आपण केलेल्या समाजिक कार्याच्या बळावर निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.